भारतीय जनता पार्टीच्या तक्रारीनंतर ठाण्यातील तीन वादग्रस्त हाॅस्पीटल आयुक्तांनी केली सील


ठाणे (प्रतिनिधी) उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तसेच अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व बायोमेडिकल सुविधा नसल्याने ठाणे शहरातील तीन रूग्णालये आज सील करण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.दरम्यान या तीन वादग्रस्त हाॅस्पीटल विरोधात भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे नेेते श्री महेश मोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.


ठाणे शहरातील साईसेवा हेल्थ सेंटर, भास्करनगर, कळवा, जनसेवा हाॅस्पीटल, वाघोबानगर, कळवा आणि श्री मातोश्री आरोग्य केंद्र, वाघोबानगर, कळवा ही रूग्णालये अनधिकृत असल्याबाबतची जवहित याचिक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सदरची रूग्णालये बंद करण्याचा निर्णय दिला होता.


उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सदर रूग्णालयांना नोटीस देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत का याची तपासणी करण्यात आली होती. सदर तपासणीमध्ये रूग्णालयांकडे फायर एनओसी आणि बायोमेडिकल वेस्ट सुविधा नसल्याने सदर रूग्णालये बंद करण्याची नोटिस दिली होती. तथापि नोटीस दिल्यानंतरही सदर रूग्णालये सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सदरची रूग्णालये सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. मुरूडकर यांनी आज सकाळी ही तीनही रूग्णालये सील केली.


गेले अनेक दिवस ठाणे महानगरपालिकेच्या कळवा विभागात अनधिकृत रुग्णालये चालविण्याऱ्या बोगस डाक्टरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले होते.अनधिकृतपणे आपला डाॅक्टरी व्यवसाय थाटणाऱ्या यातील बोगस डाक्टरांना आरोग्य विभागाचे सील करण्याचे आदेश दिलेले असूनही कारवाई झालेली नव्हती.याबाबत ठाणे भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे नेते महेश मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेवून  येत्या १५ दिवसात कारवाई झाली नाही तर कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.


कळवा विभाग अंतर्गत वाघोबानगर,भास्करनगर येथील जनसेवा केंद्र(मालक-विकलेश यादव),साईसेवा हेल्थ सेंटर्स (मालक-विकलेश यादव),मातोश्री आरोग्य केंद्र (मालक-खल्लीलुहान खान) हे रुग्णालय पालिकेच्या आरोग्य विभागाने सिल करण्याचे आदेश दिले असताना सुरुच ठेवले होते.यातील डाॅक्टरांवर कायदेशीर कारवाई तसेच अटक करण्यात आली होती.मात्र जामीन मंजूर होताच पुन्हा बोगस व्यवसायात सक्रीय झाल्याचे भाजप कामगार आघाडीने म्हटले होते. सदरची रुग्णालयाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.त्यामुळे तिन्ही रुग्णालयात कोणत्याही नवीन रुग्णाचे निदान करण्यास बेकायदेशीर आहेत.तसेच या रुग्णालयातील डाॅक्टरही बोगस असल्याने कोणत्याही आजाराचे निदान करण्यास पात्र नाही.तरीही हे डाॅक्टर रुग्णांना बरे करण्याच्या बहान्याने दाखल करुन घेत होते.सदरची बाब जनतेच्या हिताची नसून जोखीम पत्करण्यासारखी असल्याने रुग्णांना दगाफटकाही झाला होता.त्यामुळे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे नेते महेश मोरे यांनी अग्निशमन दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून तीनही रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेवून आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तसेच अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व बायोमेडिकल सुविधा नसल्याने ठाणे शहरातील तीन रूग्णालये आज सील करण्यात आली.


 


टिप्पण्या