मुंबईकरांसाठी मोठी बातमी रिक्षा-टॅक्सीची दरवाढ झाली; पाहा, किती वाढले किमान भाडे
सर्वसामान्य मुंबईकरांना रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढी संदर्भात महत्वाचे वृत्त आले आहे. त्यानुसार ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रात प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार, ऑटोरिक्षाच्या दरात किमान २ रुपयांची वाढ करण्यात आली असून काळी पिवळी टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर कुल कॅब एसी टॅक्सीच्या किमान दरात ७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (The regional transport office has decided to increase the fares of autorickshaws and taxis in Mumbai)
यापूर्वी ऑटोरिक्षाचा दर पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये इतका होता, त्यात वाढ होऊन तो आता २३ रुपये इतका झाला आहे. तर, काळी पिवळी टॅक्सीचा पहिल्या टप्प्यातील किमान दर २५ रुपये होता. त्यात वाढ होऊन तो आता २८ रुपये इतका झाला आहे. तसेच, कुल कॅब एसी टॅक्सीसाठी किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरिता ३३ रुपये इतका दर होता. त्यात वाढ होऊन तो आता ४० रुपये इतका होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा